html

या ब्लॉगवर आपले स्वागत आहे......
कृपया संस्थेचे सदस्य होण्यासाठी Regestration Form भरावा.

Friday, February 16, 2018

नवोदय मधला माझा पहिला दिवस

नवोदय मधला माझा पहिला दिवस

               जुलै महिना 1994, मी माझे वडील आणि काका सोबत तुळजापूरला आलेलो.  एक पेटी, 1 बादली आणि एक मग घेऊन मंदिराच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये एडमिशन ची प्रकिया पूर्ण केली. ते झाल्यावर कळलं अजंता हाऊस मिळालं म्हणून.

              कन्सल सर त्यावेळी प्रिन्सिपल होते. त्यांनी हिंदी मध्ये नाव गाव विचारलं, एवढी शुद्ध हिंदी पहिल्यांदाच ऐकायला मिळालेली.  नंतर अजंता हाऊस मध्ये गेलो रूम नंबर 3 मध्ये डबल कॉट ची सोय, त्यातला एक कॉट खिडकीच्या बाजूचा मिळाला. Prasad Pawar आणि मी सोबतच लहानपणापासून  ही एकत्रच आणि विशेष म्हणजे तो आमच्या बॅच ला नवोदय च्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिला आलेला. पतंगे सर ( देशमुख सर) आमचे हाऊस मास्टर त्यांना विनंती करून प्रसाद आणि मी एकाच रूम मध्ये जागा मिळवली.

              गादी वगैरे सगळं लावून झाल्यावर अजून एक आमचा रुममेट Rajesaheb Patil यांचं पण आगमन झालं. पालकांनी  वापस जायची वेळ झाली तेव्हा प्रसाद च्या पप्पांनी एक puzzle विचारला आम्हा तिघांना. मी आणि प्रसाद आपल विचार करतोय तोवर राजेसाहेब नी जराही विलंब ना लावता उत्तर देऊन टाकलं. मग काय तिघांच्या घराच्यासमोर राजेसाहेब चं जे इम्प्रेशन पडलं ते आजतागायत कायम आहे. नंतर आम्ही विचारलं कसं येतंय कसं येतंय हे उत्तर तेव्हा राजांनी आम्हाला त्यांच्या खास नागुर च्या / लोहाऱ्याच्या भाषाशैलीत समजावून सांगितलं. 

             संध्याकाळी मेस मध्ये लाईनीत जेवायला गेलो तिथे 7 वीच्या भैया लोकांची ओळख झाली. मेस मध्ये भरलेली ताट बघून लईच आनंद झाला, लिंबू पण मिळालेला त्या दिवशी. जेवताना अजिबात बोलायचं नाही जे पाहिजे ते हात वर करून योग्य ते बोट दाखवायचं. नियम ठरले होते वरणासाठी 2 बोटे, भातासाठी 5 ही बोटं, चपातीला 1 बोट वगैरे वगैरे. 

                Hanumant Jadhavar  त्यावेळी अजंता हाऊस  चा कॅप्टन, Amol Gund व्हाइस कॅप्टन. Sunetra Alset मॅडम नी जेवण झाल्यावर आमच्या आमच्या हाऊस मध्ये आम्हाला उंचीनुसार followin मध्ये जागा नेमून दिली.

                 पहिलाच दिवशी बरेच इंग्लिश शब्द कानावर पडत होते  चांगलं वाटत होत पण भीती ही वाटतं होती की आपल्याला पाठ करायला किती दिवस लागतील ह्याची.  इंग्लिश शब्द जसे की principal,  house master, vice captain, prefect, school captain, attendance, height, weight, table chair, followin..books, bag, etc..

                     मग प्राचार्य  Kansal sir यांनी  त्यांची  ओळख करून दिली आणि आमचं स्वागत केलं.  पतंगे सर ने सगळ्यांचं जेवण झालं का? जेवण आवडलं का ह्याची खात्री केली.  KR Kamble  sir नीही आमची जेवण झाल्याची खात्री करून घेतली. Dadasaheb Wadikar  त्यावेळी 12 वीला गेले होते, अजूनही तेच स्कूल कॅप्टन होते कारण 11 वी ची बॅच चालू झाली नव्हती. त्यांनी सावधान विश्राम ची ऑर्डर देऊन सगळ्या house captain कडून attendance घेतला आणि JP sir na दिला.

                   जेवणानंतर हॉस्टेल वर आलो, येताना कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टन ने स्वतःची जबाबदारी पार पाडत आम्हाला लाईन मध्ये चालणं शिकवलं, (followin 3). थोड्या वेळाने पतंगे सर नी आम्हाला बाहेर बोलावून सगळ्यांचे नाव गाव विचारून आई वडिलांच्या बाबतीत माहिती घेतली. 7 वीच्या मुलांनीही त्यांची माहितीं सांगितली. मग पतंगे sir आम्हाला good night म्हणून निघून गेले. 

               पण पहिला दिवस आम्हाला कुठं झोप येते, त्यातच 7 वी तले  आमचे भैया Dayanand Dhekane, Pankaj Patil,   आणि सुधीर आठवले हे तिघे आमच्या रूम मध्ये. नव्या पेट्यामध्ये काय काय नवा खाऊ आहे ह्याकडेच जास्त लक्ष, त्यात Nagnath Patil यांनी रूम मध्ये हजरी लावली आणि फार आपुलकीने आणि जवळीक तेने आमच्याशी गप्पा गोष्टी चालू केल्या. मग आपल थोडा थोडा खाऊ उघडला आणि ह्यांनी आम्हाला मोलाच्या गोष्टी सांगत त्यावर ताव मारला. आणि त्यानंतर रात्री रूम कॅप्टन ने आम्हाला झोपण्याचा आदेश दिला. सकाळी लवकर उठायचं आहे morning PT la अजिबात उशीर चालणार नाही ही सक्त warning. 
                  सकाळी लवकर उठायची भीती मनात ठेऊन फटाफट झोपी गेलो. 
                असा होता आमचा पहिला दिवस.
                अर्धवट आठवून लिखित स्वरूपात मांडायचा प्रयत्न केलाय बाकी तुमच्या कॉमेंट्स ने ते पूर्ण होईल ह्याची खात्री आहेच.
सीताराम गायकवाड
जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर
बॅच: १९९४

Sunday, October 22, 2017

"गेट टू गेदर चा मेळा..."


       अशोक दा ने वेळोवेळी 'गौरवलेल्या' कुर्डुवाडी बार्शी रोडनं प्रवास करावा लागेल असे कधी स्वप्नातही  वाटलं नव्हतं,पण गेट टु गेदर मुळं तो योग आला. किरण दा व जेजे नं सकाळी रिसिव्ह करून केलेल्या पाहूनचारांपुढे रस्त्ये व एस टि महामंडळाची अवकृपा यांचा प्रभाव गौण ठरला.

        नाशकात 12 वर्षांनंतर कुंभमेळा भरतो...दूर दुरून साधू, संन्याशी गंगेत आंघोळ करून पुण्य संचय करतात, तसा हा हि जवळपास दोन तपानंतर भेटी गाठीचा भरलेला मेळाच होता कि. इथं दुर दुरून आलेली मित्रमंडळी जमली होती, ती आठवणींच्या डोहात डुबकी मारून आनंद संचय करण्यासाठी.

       गाठींभेटीं सोबत हास्याचे ठहाके, पिन्याबरोबर जुन्या आंबट गोड आठवणींचा चकना, जेवणासोबत गप्पाष्टकांचा तडका आणि बेधुंद नाच गाणं हे सारं म्हणजे कुंभमेळ्यात संन्याशांनी नदीत डुबकी मारून मिळालेल्या आनंदा पेक्षा नक्कीच जास्त आनंददायी असावं.



     पहिल्या ब्याचची उपस्थिती व उत्साह वाखाणण्याजोगा होता. रामकृष्ण दा, विवेक दा, तात्या दा, जॅकी दा, अशोक दा, गेमराज दा आदी पुष्कळ दादा लोकांची प्रथमच प्रत्यक्ष गाठ भेट झाली, तर भोसले, जमाले, डॉ दीपक आदी 90  वाल्यांची 95 नंतर थेट आत्ताच भेट झाली, जुन्या आठवणींत डोकावन झालं... डॉ मॅक, (जे त्यांच्या सेल्फीपेक्षा हि प्रत्यक्षात जास्त हँडसम आहेत!)  प्रकाश सूर्यवंशी, सुरेश शिंदे आदींचीही नव्याने ओळख झाली.आमच्या ब्याचचा अमर थेट लातूरहून आला होता (तेहि त्याच्या तिठल्या ब्याचंच gt सोडून!) तसे नावांनी सगळेच एकमेकांना ओळखत होते, पण प्रत्यक्षात बघितल्यावर, ओह, तो तू आहेस तर, म्हणत गळा भेटी झाल्या.
     सरतेशेवटी, आपल्या नवीन संस्थेविषयी व तिच्या स्वरूपाविषयी प्राथमिक चर्चा होऊन या सोहळ्याची सांगता झाली.

     किरण दा, जेजे व सीताराम  यांच्या परिश्रमाने व पुढाकाराने हे सारं शक्य झालं म्हणून सर्वांतर्फे या त्रिदेवांचे आभार!  दीपक सरांनी वेळ काढुन, मला वेळेत सोलापूरला सोडल्याबद्दल सरांचे आभार.

     खरं तर हया गाठी भेटी, जुन्या आठवणींत रमनं हे सारं म्हणजे नवोदयचे तेंव्हाचे ते क्षण पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्नच असतो की, कारण तेव्हा आपल्याला कुठं ओळखता आलं होत त्या क्षणांच महत्व? तेव्हा तर आपल्याला घरची ओढ! दैवानं दिलेला ते देनं आपल्याला घेता कुठं आलं?...हि खंत, दैवाकडे,  नवोदयनन्सची कायम राहील... म्हणूनच हा शेर, काहीश्या प्रातिनिधिक भावना मांडणारा...

नवोदयचे दिवस म्हणजे, पेग होता तू भरून उंचावलेला,
पण आम्ही साले कर्मदारिद्री, कडवट म्हणत कण्हत रिचवला.
आता कळतंय त्या पेगनं अख्ख आयुष्य नशिल केलं,
पण खंत आमच्या सलते उरी
तेंव्हा चिअर्स म्हणता नाहि आलं...
तेंव्हा चिअर्स म्हणता नाही आलं...

                                                   -Mahendra Pangarkar (Nashik)

Purpose of Establishment of Society 

नवोदय माजी विद्यर्थी  सामाजिक सेवाभावी संस्था, तुळजापूर  

                 Now since JNVT alumni has become a legal body / society, it's thought out to reach all members who intend to help fellow Alumnus or JNV pass out for his / her higher studies and career making. Later the same help can be expended to needy elsewhere. It's just a beginning that will make progress as per consensus amongest members who will democratically elect office bearers.
                  I appeal all to become members of desperately awaited legal body.
                  This was outcome of efforts taken by Adv Amol Gund and his team. He briefed everyone of us who attended Kuslamb meet organized by Kiran Gadekar and Jejeram Vhale. Best wishes for the registered society.


Get Together -Discussion on Forming Society

        
On 20 th October 2017 we discussed about self sustaining model for our Alumni Organization.
1. For getting permanent membership of Society Rs.2000 which is one time fees collected at the time of registration.
2. Collection of Rs. 500 per month from all registered members.
3. Where all deposits will earn interest of approximately 7% on their deposits (not immediately)
4. Once we achieve target of 500 members we will start giving loan and afterward all deposits will start earning interest as per decided rate.
5. Once we start functioning properly we will recruit staff to handle all day to day activities.
6. All expenditures will be paid from profit earned by society by giving loan and collecting deposits.
7. All Charity/help will be done by registered society so that we can raise fund for needy people and Genuineness of help can be decided by the members of the society.
8. Will focus to involve all batches in this activity
Face book post of विवेक घोडकेदादा

Welcome to our JNVT ALUMNI Blog.
This blogs created for the communicate with the alumni.